ग्रामीण भागातील माय माऊल्या म्हणतात ” आमच्या डोक्यावरचा हंडा उतरवणाऱ्या श्वेताताईंनाच पुन्हा आमदार करणार ”
सुमारे दोन अब्ज रुपयांच्या निधीमधून १३५ गावे होणार ‘ तहान मुक्त ‘
जलजीवन मिशन या केंद्र शासनाच्या योजनेतून आ. श्वेताताई महाले यांनी चिखली मतदारसंघातील १३५ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न नेहमीसाठी निकाली काढला असून तब्बल १ अब्ज ९८ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. मंजूर झालेल्या १२२ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर असून उर्वरित कामे देखील प्रगतीपथावर आहेत. जलजीवन मिशन योजना ज्या ज्या गावात राबवली जात आहे तेथे आता लवकरच नळ योजनेद्वारे घराघरात पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. याद्वारे गाव खेड्यातल्या आई बहिणींच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरवण्याचा आपला संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने आ. श्वेताताई महाले यांची दमदार वाटचाल सुरू आहे.


